महाराष्ट्र
21-Feb-2025
SSC Exam : पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला ; पेपरचे फोटो व्हायरल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा केंद्रावर दहावीचा (10 Th Exam) मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
१० वी (SSC Exam) व १२ वीच्या परीक्षा होत आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात 'कॉपीमुक्त अभियान' (Copy-free campaign) राबविण्यात येत आहे. यादरम्यान, शिक्षण वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत असल्याच समोर आलं आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आला आहे.
जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या तळणी येथे दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉप्या पुरवणाऱ्यांची गर्दी केंद्राबाहेर पाहायला मिळाली, मराठीच्या पहिल्याच पेपरला, केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे, त्यामुळे आत मध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला.
परिक्षा केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघड झालाय.
संपूर्ण राज्यात दहावीच्या बोर्डाती परीक्षा सुरू झाली आहे. वर्षभरापासून या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत होते. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे.
उत्तरांसहीत प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स अवघ्या २० रुपयांत विद्यार्थ्यांना विकल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागं झालं असून, या प्रकाराची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
२० रूपयात उत्तरपत्रिका विकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉर्ड दहावीचा पेपर रद्द करणार की, नाही, कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे