महाराष्ट्र
167
10
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावांना मुळा धरणाच्या कालव्याचे पाणी मिळण्यासाठी कृती समीती स्थापन करणार - ढाकणे
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावांना मुळा धरणाच्या कालव्याचे पाणी मिळण्यासाठी कृती समीती स्थापन करणार - ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
प्रभु पिंपरी, पागोरी पिंपळगांव,सोमठाणे,खेर्डै,दुले चांदगाव,माळेगाव,कळस पिंपरी कोरडगांव व खरवंडी कासार परीसरातील गावे जिरायत पट्टयात येत असून ह्या परिसरात मुळा धरणाच्या कालव्याचे पाणी यावे यासाठी आपण शेतकऱ्यांना जागृत करणार असूनन लवकरच या परीसरातील गावांचा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणुन आपण कृती समीती स्थापन करणार असून शिष्टमंडळासह जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहापासुन वंचित राहीलेल्या परीसरातील गावांना मुळा धरणाचे पाणी मिळण्यासाठी लक्ष वेदणार आहोत. अशी माहीती राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे दक्षिण जिल्हा सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी माहीती दिली.
मुळा धरणाचे पाणी प्रभु पिंपरी, पागोरी पिंपळगांव, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, लोखंडवाडी, माळेगांव, वांळुज, वसुजळगांव, सोमठाणे नलवडे, भुतेटाकळी, कोरडगांव, औरंगपुर, जिरेवाडी, कळसपिंपरी, तोंडोळी, सोनोशी, दैत्यनांदुर, येळी, बडेवाडी, काटेवाडी,खरवंडीकासार, मुंगसवाडे, एकनाथवाडी, भालगांव व खरमाटवाडी या गावांना मिळण्यास काहीच अडचण नव्हती परंतु दुर्देवाने विकासाचे राजकारण झाले नाही व शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या प्रश्नाकडे कोणी लक्ष घातले नसल्यामुळे ही गांवे विकासापासुन वंचीत राहीली आहेत. मुळा धरणाचे पाणी सुसरे व साकेगांवला आले तेच कालव्याचे पाणी पुर्वभगातील शेवटच्या टोकापर्यन्त नेण्यासाठी या अगोधरच प्रयत्न करणे गरजेचे होते परंतु हा प्रश्न जाणुनबुजून बाजुला ठेवून ही गावे विकासापासुन दुर्लक्षित ठेवण्यात आले.उत्पन्नाचे कोणतेही दुसरे साधन नसल्यामुळे नाईलास्तव येथील शेतकऱ्यांना जमीन असून देखील पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्षे ऊसतोड करावी लागत असल्यामुळे हा परिसर ऊसतोड कामगारांचा परीसर म्हणुन ओळखला जातो.नेमके हेच मला शेतकरी पुत्र असल्यामुळे अनेक दिवसापासुन खटकले जाते. मुळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे पुर्वभागाच्या शेवट टोकापर्यत मिळण्यासाठी आपण शेतकरीपुत्र असल्यामुळे जातीने लक्ष घालणार असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना जागृत करणार असून शेतकऱ्यांच्या जीवाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवून प्रसंगी अंदोलने करुन महाराष्ट्र सरकारचे परीसरातील गावातील शेतकऱ्यांच्या वतीने लक्ष वेदणार आहोत असेही शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी सांगितले.
Tags :

