महाराष्ट्र
506
10
वाळू माफियांचा लवकरच बंदोबस्त करुन सर्वंकष धोरण आणले जाईल.- महसूल मंञी ना.विखे
By Admin
वाळू माफियांचा लवकरच बंदोबस्त करुन सर्वंकष धोरण आणले जाईल.- महसूल मंञी ना.विखे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वाळू माफी आणून वाळू उपसा करत नदीचे वाळवंट तयार केले आहे मात्र या बोकाळलेल्या वाळू माफियांचा लवकरच बंदोबस्त करून एक महिन्याच्या आत संपूर्ण राज्यामध्ये सर्वंकष धोरण आणले जाईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात केली.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासरकारमध्ये महसूल मंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचे प्रथमच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या वतीने जंगी स्वागत करत नागरी सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार विखे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ होते याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ अशोकराव इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात, जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, शिवाजीराव धुमाळ डॉ भानुदास ढेरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जावेद जागीरदार, लहानु नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
ना विखे पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सर्वत्र वाळू माफिया आणि भूमाफिया मोठ्या प्रमाणात वाढलेले होते . संगमनेर तालुक्यातील एका वाळू माफिया ने तर एका अंध व्यक्तीच्या डोक्याला पिस्तूल लावण्यापर्यंत त्याची मज केली आहे. इतका या वाळू माफियांना माज आला आहे वाळू माफियामध्ये शा मुजोरगिरी करणाऱ्या वाळू माफीयांचा माज हे सरकार उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशार त्यांनी वाळू माफियांना दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील जनता पारतंत्र्यात होती मात्र आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ही जनता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेली आहे महाविकास आघाडीसरकारच्या काळात जनतेची पीछेहाट झाली होती मात्र सध्याचे हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सर कार आहे त्यामुळे निश्चितच या सरकार कडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे सांगून नामदार विखे म्हणाले की मागील अडीच वर्षाच्या काळात राज्याला जे काही पाहिजे ते केंद्र सरकारकडूनच पाहिजे अशी टीका महाविकास आघाडीचे सरकारचे मंत्री टीका करत होते .
पण अडीच वर्ष त्यांचे सरकार होते त्यावेळी ते काय भजे काढतहोते की काय अशी कोपरखिळी ना विखे यांनीमहा विकास आघाडीच्या मंत्र्यांना मारून या सरका रमधील मंत्र्यांनी केवळ भ्रष्टाचार करून सर्व सामान्य जनतेची लूटच केली असल्याचीटीका त्यांनी केली कोविडच्या काळामध्येया सरकार मधील मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिलीच दिली.
परंतु प्रत्येकाला मोफत धान्य सुद्धा उपलब्ध करून दिले आहे परंतु हे वाटप करताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्याची दानत होत नाही त्यांच्या योजनांवर या महाविकास आघाडी सरकारतील मंत्र्यांनी आपली पाठ थोपटून घेतली असल्याचे टीका त्यांनी केली
Tags :

