महाराष्ट्र
100645
10
12 लाख शेतकऱ्यांना ११३० कोटी रुपये मिळण्याचा मोकळा
By Admin
12 लाख शेतकऱ्यांना ११३० कोटी रुपये मिळण्याचा मोकळा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ११२९.३७ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असून, आतापर्यंत २६४.२३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना सहभाग नोंदविला होता. मंध्यतरी झालेला अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात आली होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, पीक कापणी प्रयोग आधारित एकूण ११२९.३७ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपलब्ध होणाऱ्या विमा रक्कमचे आकडे पुढील प्रमाणे: अकोले तालुका ४७.३६७ कोटी, संगमनेर १२८.९८ कोटी, राहाता १२१.२२ कोटी, श्रीरामपूर ६९.५६ कोटी, नेवासा ८७.९४ कोटी, कोपरगाव ७९.५९ कोटी, राहुरी १०३.३५ कोटी, पाथर्डी ७५.६४ कोटी,
पारनेर १२३.०१ कोटी, नगर ६५.५३ कोटी, शेवगाव ९.७७ कोटी, श्रीगोंदा ४८.७८ कोटी, कर्जत ९३.८५ कोटी, जामखेड ७४.५१ कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून, विमा कंपनी व राज्य शासनामार्फत विमा रक्कमेचा उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले
एक रुपयात पीक विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या योजनेच्या माध्यमातून सरकारची आहे. यापूर्वी २५ टक्के अग्रीम रक्कम देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित रक्कमही मंजूर झाल्याने या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होईल. -राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री
Tags :

