१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 11 मे 2021
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी लशी या 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.
ते म्हणाले, 'राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत आहे. बरे होण्याच्या दर वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. व्हॅक्सिसीन 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहे, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचे आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहेत'. वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू,' असे टोपे यांनी सांगितले.