Breaking- ७ हजार २०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली ५ हजार ७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. याबरोबरच राज्यातील पोलिस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री वळसे काल अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते 'ई-टपाल' सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलिस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.