भाजपचा शंखनाद; राज्य सरकार धार्मिक भावनांशी खेळतय
By Admin
भाजपचा शंखनाद; राज्य सरकार धार्मिक भावनांशी खेळतय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य सरकाराने गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच मंदिर उघडण्यावर बंदी घातली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना जवळजवळ सर्वच क्षेत्रावरील निर्बंध उठवून सर्व व्यवस्थीतरित्या सुरु केले. विशेषत: बार ही सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र मंदिरे बंद ठेवले आहेत. जो देव मनुष्यावर संकट आल्यावर धावून येतो, त्याच देवाला कोंडून ठेवण्याचे पाप हे सरकार करत आहे. आता सर्वत्र पुर्ववत परिस्थिती होत असतांना मंदिरे बंद ठेवून शासन भाविकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे, असा आरोप भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केला.
शहर जिल्हा भाजपतर्फे राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरासमोर आरती करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष गंधे, ज्येष्ठ नेेते अॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, वसंत लोढा, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अंजली देवकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅड.अभय आगरकर म्हणाले, "मंदिरे आपली प्रेरणा आणि शक्तीस्थाने आहेत. ही प्रेरणास्थाने बंद ठेवून सरकार भाविकांना एकप्रकारे वेठीस धरत आहेत. मंदिरातून कोरोना होतो व इतर ठिकाणाहून होत नाही का? राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी कारभार असून, त्यामुळे भावनांबरोबर मंदिरावर अवलंबून असणार्या अनेक घटकांवर हा अन्याय आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेईपर्यंत आंदोलने केली जातील, असे सांगितले.
वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, महेश तवले, उमेश साठे, अमित गटणे, किशोर बोरा, ज्ञानेश्वर काळे, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, वसंत राठोड, गणेश साठे, पंकज जहागिरदार, आशिष अनेचा, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, बाळासाहेब खताडे, किशोर कटोरे, संदिप मुनोत आदि उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाच्या मंदिर बंद ठेवण्याच्या भुमिकेचा आसूड मारुन, शंखनाद, घंटानाद करुन निषेध करण्यात आला.

